अल्पवयीन मूल ही घेतात "प्रायव्हसी" अनुभवासाठी लॉजचाआधार ?

नागठाणे : ‘‘क्षणीक सुखाच्या त्या भावनांना’ प्रायव्हसीच्या नावाखाली अनुभवण्यासाठी घेतला जातोय का लॉजचा आधार? असा प्रश्न भेडसावत आहे. वयात येणार्‍या पाल्यांना सांभाळण्याची जबाबदारी पालकांची, शिक्षकांची की पोलीसांची? असा  प्रश्न आज अनेकांना भेडसावत आहे.  सातारा तालुक्यातील विविध लॉजच्या ठिकाणी जूजबी कारवाईने नेमकं  काय साध्य होतं हा संशोधनाचा विषय आहे. नकळत्या वयात मित्र मैत्रींणीच्या गराड्यात ‘‘कुछ तो थ्रिलिंग चाहिये’’ म्हणत, वाहत जाणार्‍या तरूणाईला कोंडमारा झालेल्या त्या भावनेचा निचरा करण्यासाठी हवी आहे प्रायव्हसी. याच गरजांच्या पुर्ततेचा व्यवहार  राजरोसपणे  लॉज, हॉटेल्स सोबत कॅफें सारख्या विविध ठिकाणी बिनधोक पणे सुरू असताना.  ‘‘सापडतो तो चोर’’ या म्हणी प्रमाणे काही ठिकाणी झालेल्या पोलीस करवाईवरून हल्ली चर्चेचा विषय बनली आहेत काही लॉज., जिथं जाणीव पूर्वक तासिका तत्वांवर  प्रायव्हसी खेरेदी विक्रीचा व्यवहार अगदी बेमालूमपणे केला जात आहे. नोंदवह्या नाहीत, दिखाऊ सीसीटीव्ही नाहीत छुप्या कॅमेर्यानी कोण कैद तर केले जात नाहीना? शिवाय अंधारात सोयीने  कंपार्टमेंट हे सारं नियमात बसत का , मात्र त्याचे निमीत्त ठरून  प्रेमासारख्या निर्मळ भावनेला उकिरड्यावर लोळणार्‍यांप्रमाणे तासिका तत्वावर  खेळ खेळू देणारे, तसे वातावरण तयार करणारे व त्या वातावरणाला खतपाणी घालणारे या संगळ्यांच्याच हातभारामुळे ‘‘कुछ तो गडबड है दया’’ ‘‘तोड दो दरवाजा’’ म्हणायची वेळ आज त्रस्त पालकांवर आली आहे. याचीच दखल सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख,अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी घेत सातारा  जिल्ह्यातील  नियमबाह्य  लॉजमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासोबतच, नियमबाह्या आढळेल्या लॉजवर कडक कारवाई करा असा सुचना वजा इशाराच पोलीस ठाण्यांच्या कारभार्‍यांना दिल्याने जिल्ह्यात लॉजवर आता पोलीसांची करडी नजर दिसून येत आहे.

 


  आपली मुलं नेमकी काय करतात याकडे लक्ष द्यायला वेळ नसणार्‍या पालकांबद्दल कोणी काय बोलायचं., मात्र ज्यांनी आपल्या लेकरांच्या उज्वल भविष्याची स्वप्न रंगवली., रक्तांचे पाणी करून, काबाड कष्टाने  एक एक पैसा जमा करून पोरा बाळांना वाढविण्यासाठी रात्रीचा दिवस केला., अशा पालकांच्या मेहनतीला मातीमोल ठरवणाऱ्या व माता पित्यांच्या त्यागाची जाणीव नसलेली तरूणाई., जर तासिकातत्वांच्या अनुभवासाठी आकर्षित होत असेल तर.?हे  दुर्देव नक्की कोणाच्या तरी मनाला सलत का नाही असा प्रश्न आहे. यामध्ये दोष नक्की कोणाचा चुक काय बरोबर काय आमचा व्यवसाय आहे. असे निर्ढावले पणे सांगणारे, व आम्हाला कोणाची बंधने नकोत आम्ही आमच्या मर्जीचे मालक आहोत आम्हाला हवं ते हवं तिथं करू तुम्ही बोलणारे कोण असे म्हणणारे कैक आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त