व्याजाने का होईना जरातरी सुख दे शेतकऱ्यांची देवाकडे मागणी

ढेबेवाडी ता.पाटण येथे वळीव पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान.

कराड  : गेले आठ दिवस ढेबेवाडीसह परीसरात वळीव पाउसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक मातीमोल जाले आहे. 

 हवामान खात्याच्या अंदाजानुसार १५ मे पासुन हवामानात बदल झाला असुन अचानक काळे ढग जमा होउन तालुक्यातील अनेक भागात अवकाळी पावसाला सुरवात झाली आहे त्यामुळे सरासरी आर्धा तास कोसळणार्या पावसाने बुधवार पासुन सलग कोसळायला सुरवात केली .त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी अशी परीस्थीती झाली आहे . अनेक ठीकाणी गेले आठ दिवस ढेबेवाडी ता.पाटण येथे पावसाची संततधार पडत आहे. 


शेतकऱ्यांनी जनावरांसाठी साठवलेला चारा वळीव पावसाने पुर्णपणे भीजल्याने जनावरांच्या चाऱ्यांचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे.तर अवघ्या काही दिवसावर उन्हाळ्यातील पीक काढणी आली असताना उन्हाळी भुयमुंग, हँबरीड सारख्या पीकांना अक्षरशा मोड आले आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेल पीक गमावल्याने येथील शेतकरी हतबल झाला असुन . शेती करायची तरी कशी ? असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.खरीपासाठी शेतकऱ्यांनी बी-बीयाने,खाते याचे नियोजन केले असले तरी खरीप पीकासाठी शेती कधी तयार होईल या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. कारण शेतात पाणीच पाणी शेतीच्या मशागतीची कामे खोंळंबली शेतात घात यायला १५ दिवस लागतील.अशात आवकाळी संपतनाही तोच मान्सुन सक्रीय होत असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्वतवल्यामुळे शेतकरी वर्गात चिंता वाढली आहे.

मग पेरणी करायची कधी ?

 हवामान खात्याचा अंदाज पहाता सध्या पाटण तालुक्यासह राज्यभरातील शेतकऱ्यांनावर ओल्या दुष्काळाच सावट आहे.संबंधीत विभागाने वळीव पावसाने झालेल्या पीकनुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना भरपाई करुण ध्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातुन केली जात आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त