RCB’च्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरी, 10 जणांचा मृत्यू तर 20 जण गंभीर जखमी'

बेंगळुर : आरसीबी संघाने आयपीएल २०२५ जिंकले आहे आणि त्यानंतर बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये संपूर्ण संघाचा सन्मान केला जात आहे. मात्र, या सन्मानादरम्यान असे काही घडले ज्याची कोणालाही अपेक्षा नव्हती.


 प्रत्यक्षात, चिन्नास्वामी स्टेडियमजवळ चेंगराचेंगरी झाली आणि त्यात 10 जणांचा मृत्यू झाला. या चेंगराचेंगरीत २० जण गंभीर जखमीही झाले आहेत. तर १० जणांची प्रकृती गंभीर आहे. चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महिलांचाही समावेश आहे.


 चिन्नास्वामी स्टेडियममध्ये चेंगराचेंगरी कशी झाली? चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर आरसीबीच्या विजयी परेडमध्ये सहभागी असलेल्या मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. त्यांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला आणि त्यानंतर चेंगराचेंगरी झाली असल्याचं सांगितलं जात आहे. मृत्यू झालेले नेमके कोण आहेत, हे अद्याप समजू शकलेले नाहीत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त