प्रधानमंत्र्यांनी नवीन बांधलेल्या संसदेवर ठेवलेल्या राष्ट्रीय शिल्पाचा वंचित बहुजन आघाडी कडून जाहीर निषेध

Vanchit Bahujan Aghadi publicly protested against this national sculpture to be placed on the newly built Parliament by the Prime Minister
नुकतेच प्रधानमंत्र्यांनी नवीन बांधलेल्या संसदेवर ठेवण्यात येणाऱ्या या राष्ट्रीय शिल्पाचे उद्घाटन केले. मात्र या नवीन शिल्पातील शांतभाव वगळून, चारही सिंहाचे भाव अतिशय हिंस्र दाखवले आहेत ज्यामुळे मूळ शिल्पाचा आणि त्यात असलेल्या बोधाचा अपमान झाला आहे. सिंहाच्या मूळ शिल्पात बदल करुन नव्या शिल्पातील हिंस्त्रपणा हा संघाचा विश्वास असलेल्या हिंसावादी व विद्वेषी राष्ट्रवादाच्या मूल्यांचे प्रतिक आहे. राष्ट्र चिन्हात बदल घडवून आणण्याचे हे गंभीर षडयंत्र आहे

26 जानेवारी 1950 साली भारत सरकारने सम्राट अशोक यांनी सारनाथ येथे उभारलेल्या स्तंभावरील "सिंह शीर्ष" हे स्वंतत्र भारताची "राष्ट्रीय मुद्रा" म्हणून स्वीकारले. मुळात हे शिल्प आणि त्याच्या खाली असलेले हत्ती, बैल, दौडणारा घोडा आणि सिंह यांची कोरीव शिल्प हे भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग अधोरेखित करते. मानवतावादी, संपूर्ण प्राणीमात्रां विषयी करुणा व मंगल कामना असलेला बुद्ध विचार म्हणजेच धम्म याचे प्रतीक हा सिंह आहे. तो शांत आहे. स्वतंत्र आहे. त्याच्या चेहन्यावर गंभीर भाव आहेत व डोळ्यात दृढ निश्चय आहे. त्याचा जबडा नैसर्गिक रीत्या उघडलेला आहे. शिल्पकाराने अतिशय तन्मयतेने, संपूर्ण बुद्ध विचारांचे भाव या संपूर्ण शिल्पात कोरलेले पाहायला मिळतात. हे मानवतावादी विचार चारही दिशांना पसरावे म्हणून हे चार सिंह पाठीला पाठ लावून चार दिशांकडे तोंड करून आहेत. सम्राट अशोक यांना हे अभिप्रेत होते म्हणून त्यांनी हा स्तंभ व हे शिल्प उभारले आहे .हेच मानवतावादी, सर्वाप्रती स्वातंत्र्य, समता आणि बंधूभावाचा विचार स्वतंत्र झालेल्या भारताला सर्व जगात घोषित करायचे होते. म्हणूनच भारताच्या प्रथम मंत्रिमंडळाने एकमताने हे शिल्प, "राष्ट्रीय मुद्रा" म्हणून स्वीकार केले. नुकतेच प्रधानमंत्र्यांनी नवीन बांधलेल्या संसदेवर ठेवण्यात येणाऱ्या या राष्ट्रीय शिल्पाचे उद्घाटन केले. मात्र या नवीन शिल्पातील शांतभाव वगळून, चारही सिंहाचे भाव अतिशय हिंस्र दाखवले आहेत ज्यामुळे मूळ शिल्पाचा आणि त्यात असलेल्या बोधाचा अपमान झाला आहे. सिंहाच्या मूळ शिल्पात बदल करुन नव्या शिल्पातील हिंस्त्रपणा हा संघाचा विश्वास असलेल्या हिंसावादी व विद्वेषी राष्ट्रवादाच्या मूल्यांचे प्रतिक आहे. राष्ट्र चिन्हात बदल घडवून आणण्याचे हे गंभीर षडयंत्र आहे. असे शिल्प मान्य करण्याचा निर्णय हा भारताच्या निर्मात्यांनी व सार्वभौम प्रजासत्ताक भारताने स्वीकारलेल्या स्वतंत्र्य, समता, न्याय व बंधुत्वाच्या मूल्यांचा अपमान होत आहे. या नवीन हिंस्र शिल्पाचा (राष्ट्रीय मुद्रेचा नव्हे) आणि ह्या शिल्पाची संकल्पना बदलण्याचा निर्णय घेणाऱ्या सरकारचा वंचित बहुजन आघाडी यांनी जाहीर निषेध केला आहे .

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त