सैनिकांचे मनोबल तोडू नका; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
Satara News Team
- Thu 1st May 2025 03:56 pm
- बातमी शेयर करा

पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुप्रीम कोर्टात गुरुवारी सुनावणी पार पडली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या खटल्याची सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टान नकार दिला. ही सुनावणी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठासमोर पार पडली. पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली न्यायालयीन आयोग स्थापन करण्याची मागणी करण्यात आली होती.
याशिवाय, जम्मू आणि काश्मीरच्या पर्यटन क्षेत्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी केंद्र, जम्मू आणि काश्मीर, सीआरपीएफ, एनआयए यांना कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यासही सांगितले होते. मात्र सुप्रीम कोर्टाने याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यांशी संबंधित याचिकेवर सुप्रीम कोर्टाने मोठी टिप्पणी केली. पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्यासाठी एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती
. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल जनहित याचिकाकर्त्यांना कोर्टाने सवाल केला. तुम्हाला सुरक्षा दलांचे मनोधैर्य खचवायचे आहे का? असा सवाल सुप्रीम कोर्टाने केला. यापुढे असे मुद्दे न्यायालयात आणू नयेत असे निर्देशही कोर्टाने दिले आहे. सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. याचिकाकर्त्याला फटकारताना सुप्रीम कोर्टाने, "अशा जनहित याचिका दाखल करण्यापूर्वी जबाबदारीने वागा. तुमच्या देशाप्रती तुमचे काही कर्तव्य आहे. ही वेळ अशी आहे जेव्हा प्रत्येक भारतीय दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी एकत्र आला आहे.
त्यामुळे आमच्या सैन्याचे मनोबल तोडू नका. ही योग्य वेळ नाही आणि या प्रकरणाची संवेदनशीलता पहा," असं म्हटलं. न्यायाधीशांचे काम वादांवर निर्णय घेणे आहे, चौकशी करणे नाही, असेही सुप्रीम कोर्टाने म्हटलं.
"आमच्याकडे तपास करण्याचे कौशल्य कधीपासून आले आहे? तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांना चौकशी करण्यास सांगत आहात. ते फक्त निकाल देऊ शकतात. आम्हाला आदेश देण्यास सांगू नका," असं म्हणत कोर्टाने याचिकाकर्त्याला सुनावले.
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Thu 1st May 2025 03:56 pm
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Thu 1st May 2025 03:56 pm
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Thu 1st May 2025 03:56 pm
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Thu 1st May 2025 03:56 pm
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Thu 1st May 2025 03:56 pm
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Thu 1st May 2025 03:56 pm
संबंधित बातम्या
-
मंत्री जयकुमार गोरेंच्या हस्ते १६ कोटींच्या विकासकामांचे होणार भूमिपूजन;जाहीर सभेचेही आयोजन
- Thu 1st May 2025 03:56 pm
-
एक मच्छर काय करतो ते नाना पाटेकरांना विचारा; आ.सचिन पाटलांचा रामराजेंना टोला
- Thu 1st May 2025 03:56 pm
-
मंत्री शिवेंद्रसिंहराजेच्या घरासमोर रक्तदान आंदोलन
- Thu 1st May 2025 03:56 pm
-
चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..
- Thu 1st May 2025 03:56 pm
-
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला
- Thu 1st May 2025 03:56 pm
-
माझं कुणीही काही वाकडं करू शकत नाय; जयकुमार गोरेंनी शड्डू ठोकला
- Thu 1st May 2025 03:56 pm
-
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला 1 कोटीची खंडणी घेताना अटक
- Thu 1st May 2025 03:56 pm
-
हणबरवाडी- धनगरवाडी उपसा जलसिंचन योजनेचा दुसरा टप्पा जून अखेर पूर्ण करणार
- Thu 1st May 2025 03:56 pm