अजित पवारांची हकालपट्टी करा, अन्यथा भाजपविरोधात रान उठवू; शालिनीताईंचा इशारा
Satara News Team
- Sun 3rd Dec 2023 12:37 pm
- बातमी शेयर करा

सातारा : राज्याच्या उपमुख्यमंत्रीअजित पवार यांनी शिखर बँकेत २५ हजार कोटी तर सिंचन विभागात ७० हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी केला आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासह राज्याच्या मंत्रिमंडळात असलेले भ्रष्टाचारी मंत्री छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांचीही हकालपट्टी करावी. अन्यथा आगामी निवडणुकांच्या काळात राज्यातून भाजपला बाहेर करा, असे रान आम्ही उठवू, असा इशारा त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.
पुढे बोलताना शालिनीताई पाटील म्हणाल्या , महाराष्ट्र सरकारच्या कारभाराचा मोठा इतिहास आहे. यशवंतराव चव्हाण यांनी राज्याच्या अर्थमंत्रिपदाची सूत्रे हातात असतानाही १०० रुपये उसने घ्या म्हणून वेणूताई यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. तर अंतुले यांच्या काळात महाराष्ट्रातील कलाकार, चित्रकार यांच्यासाठीचा ५ कोटींचा फंड आपल्याकडे ठेवल्याने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांची चौकशी लावली होती. मात्र, २५ हजार कोटींचा भ्रष्टाचार करून सुद्धा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अजित पवारांसारख्या नेत्यांना पाठीशी घालून त्यांना राज्यात उपमुख्यमंत्रिपद देतात, हा खूप गंभीर प्रकार आहे. इंदिरा गांधी ५ कोटींसाठी एवढ्या गंभीर होत्या; पण ज्या राजदंडासमोर पंतप्रधान मोदी नतमस्तक होतात तोच राजदंड एखाद्या भ्रष्ट माणसाकडे देतात, हा प्रकार अत्यंच चुकीचा असल्याचेही त्या म्हणाल्या.
शालिनाताई पाटील म्हणाल्या अजित पवारांच्यावर एवढे आरोप आणि एफआयआर दाखल करून सुद्धा त्यांच्याविरोधात चार्जशीट दाखल केलेले नाही. त्यामुळे तत्कालीन पोलिसांवरही कारवाई झाली पाहिजे. त्याबरोबरच राज्याच्या मंत्रिमंडळात अजित पवार यांचे सहकारी असलेले छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन अपहारप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा झाली आहे. शिखर बँक घोटाळ्यात अजित पवारांसोबत हसन मुश्रीफ यांचाही सहभाग आहे. त्यामुळे या मंत्र्यांनाही मंत्रिमंडळातून काढून टाकावे. या सर्वांकडे दुर्लक्ष करणारे राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे या सर्व प्रकरणावर पांघरूण घालत आहेत. त्यामुळे यांच्याकडेही पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. त्यांनीही याबाबत योग्य भूमिका घेतली पाहिजे होती, असेही त्या म्हणाल्या. अशीच परिस्थिती राहिल्यास आगामी निवडणुका भाजपला जड जातील.
राज्याच्या मंत्रिमंडळात असलेल्या अजित पवार यांच्यासह भ्रष्टाचारी नेत्यांची चौकशी करण्यासाठी विशेष कोर्ट स्थापन करावे. त्यामार्फत सर्वांची चौकशी करण्यात यावी. तोपर्यंत त्यांची हकालपट्टी करून दोषी आढळल्यास जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी मागणीही शालिनीताई पाटील यांनी केली आहे.
स्थानिक बातम्या
अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना; पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण...,
- Sun 3rd Dec 2023 12:37 pm
मावशीच्या नवऱ्याकडून सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार
- Sun 3rd Dec 2023 12:37 pm
नागठाणेजवळ टेम्पोच्या धडकेत बापलेकीचा मृत्यू
- Sun 3rd Dec 2023 12:37 pm
75 हजाराची लाच घेताना कोडोलीचा मंडलाधिकारी जाळ्यात
- Sun 3rd Dec 2023 12:37 pm
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर' अभियानांतर्गत पुसेसावळीत उद्या कॅम्पचे आयोजन
- Sun 3rd Dec 2023 12:37 pm
संबंधित बातम्या
-
एक मच्छर काय करतो ते नाना पाटेकरांना विचारा; आ.सचिन पाटलांचा रामराजेंना टोला
- Sun 3rd Dec 2023 12:37 pm
-
मंत्री शिवेंद्रसिंहराजेच्या घरासमोर रक्तदान आंदोलन
- Sun 3rd Dec 2023 12:37 pm
-
चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..
- Sun 3rd Dec 2023 12:37 pm
-
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला
- Sun 3rd Dec 2023 12:37 pm
-
सैनिकांचे मनोबल तोडू नका; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
- Sun 3rd Dec 2023 12:37 pm
-
माझं कुणीही काही वाकडं करू शकत नाय; जयकुमार गोरेंनी शड्डू ठोकला
- Sun 3rd Dec 2023 12:37 pm
-
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला 1 कोटीची खंडणी घेताना अटक
- Sun 3rd Dec 2023 12:37 pm
-
हणबरवाडी- धनगरवाडी उपसा जलसिंचन योजनेचा दुसरा टप्पा जून अखेर पूर्ण करणार
- Sun 3rd Dec 2023 12:37 pm