साताऱ्यात कोरोनाचा संसर्ग वेग पकडू लागला

कोरोनाबाधित सापडत असले, तरी नागरिकांच्या शरीराला या विषाणूची ओळख झाल्याने रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचेही कारण नाही. परंतु, प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी आवश्‍यक उपाययोजनांसाठी तातडीने पुढाकार घेणे आवश्यक आहे.

सातारा : गेल्या काही दिवसांपासून कमी व संथगतीने असलेला कोरोनाचा संसर्ग वेग पकडू लागला आहे. जिल्ह्यात काल ५३ तर, आज ६९ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे संसर्गाचा धोका ओळखून नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन पुन्हा सुरू करणे आवश्यक आहे.

 अडीच वर्षांपूर्वी जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर जिल्ह्यात कोरोनाचा वेगाने प्रसार झाला. दररोज हजारोंच्या संख्येने बाधित सापडले. मृतांची संख्याही हजारोंच्या घरात गेली. त्याच्याशी मुकाबला करण्यासाठी प्रशासन दिवस-रात्र झटत होते. नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील वावरावर मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे अनेकांची आर्थिक कोंडीही झाली. गेल्या सहा महिन्यांत कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत गेले. त्यामुळे राज्यासह जिल्ह्यातील जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरवात झाली. नागरिकांवरील निर्बंधही हटले आहेत. मात्र, निर्बंध हटले तरी, कोरोना अजूनही संपला नाही, त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करा, असे प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत होते. 
 उपाययोजनांसाठी तातडीने पुढाकार घ्या

कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी नागरिकांनी मास्कचा वापर करावा, गर्दीत जाणे टाळावे, एकमेकांत अंतर ठेवावे, तोंड, नाक, कान, डोळ्याला हात लावण्यापूर्वी साबणाने अथवा सॅनिटायझरने हात स्वच्छ करावेत. केवळ या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. कोरोनाबाधित सापडत असले, तरी नागरिकांच्या शरीराला या विषाणूची ओळख झाल्याने रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचेही कारण नाही. परंतु, प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी आवश्‍यक उपाययोजनांसाठी तातडीने पुढाकार घेणे आवश्यक आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला