बारामतीकरांचं राज्य संपलंय, आता तरी नीट वागा; आमदार शिंदेंचा शरद पवारांना टोला

सातारा : एकनाथ शिंदे हे शिवसेनेसोबत बंडखोरी करत बाहेर पडल्यानंतर त्यांना शिवसेनेतील एका मोठ्या आमदारांच्या गटानं पाठिंबा दिला. याच आमदारांच्या पाठिंब्यावर त्यांनी भाजपासोबत मिळून सरकार देखील स्थापन केलं. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेनेतून शिंदे गटात दाखल होणाऱ्या पदाधिकाऱ्यांची संख्या वाढतच आहे.
आमदारच नव्हे, तर शिवसेनेचे खासदार देखील शिंदे गटात सामील झाले आहेत. दरम्यान, राज्यात फडणवीस-शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर कोरेगावचे बंडखोर आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय. उसाची आडवा-आडवी जिरवा-जिरवी करू नका. आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सामान्य जनतेचं, शेतकऱ्यांचं राज्य आलंय, असं आमदार महेश शिंदे यांनी म्हटलंय. आता बारामतीकरांचं राज्य संपलंय. हे ध्यानात घ्या आणि नीट वागा, असा सल्ला वजा इशाराही महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीसह शरद पवार यांना दिलाय.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला