समाजसुधारणेचा वारसा पुढे नेण्यात जाधवराव कुटुंबांचे योगदान मोलाचे : संभाजीराव पाटणे
बापू वाघ
- Tue 7th Feb 2023 04:56 pm
- बातमी शेयर करा

भुईंज : सातारा जिल्ह्याला त्यातही विशेषत: वाई तालुक्याला असलेला परिवर्तनाचा, समाजसुधारनेचा मोठा वारसा आहे. तो वारसा पुढे नेण्यात भुईंज गावाने मोठे योगदान दिले असून त्यामध्ये स्व. बाबासाहेब जाधवराव इनामदार यांच्या कुटुंबाने मोलाची जबाबदारी पार पाडली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत संभाजीराव पाटणे यांनी भुईंज, ता. वाई येथे केले.
भुईंज येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित केलेल्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा, निरोपसमारंभ आणि स्व. वि. रा. तथा बाबासाहेब जाधवराव ईनामदार यांचा स्मृतीदिन अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी संभाजीराव पाटणे यांना मानाचा फेटा, शॉल, पुष्पगुच्छ व मानपत्र प्रदान करुन जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी पुढे बोलताना पाटणे म्हणाले, विद्यार्थ्यांनी सत्यप्रियता, ध्येय आणि त्याग याचा अंगिकार करुन जीवनात यशस्वी व्हावे. सामाजिक समतेचा पुरस्कार करावा. विठ्ठल रामजी शिंदे हे अस्पृश्य निवारण दौर्याच्या निमित्ताने वाई तालुक्यात आले तेव्हा त्यामध्ये प्रा. दिलीप जगताप यांचे आजोबा खाशाबा जगताप, आबासाहेब वीर यांच्या समवेत बाबासाहेबांचे वडील तात्यासाहेब जाधवराव हेही सहभागी झाले होते. हा वारसा जपण्याचे काम नव्या पिढीने करावे. सेवेची, परिवर्तनाची परंपरा जपणे सोपे नसते. त्यासाठी परीश्रम घ्यावे लागतात. ते परीश्रम घेतले जात असल्याचे इथे दिसून येत आहे. माझे सद्भाग्य म्हणून मला खूप मोठी मोठी माणसं पहायला मिळाली. त्या मोठ्या माणसांचे विचार अंगिकारणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
प्रा. दिलीप जगताप म्हणाले, जाती धर्माच्या पलिकडे जावून माणूस म्हणून जगण्याचे संस्कार ज्यातून होतो तेच खरे शिक्षण आहे. असे शिक्षण केवळ ऑक्सफर्ड, केंब्रीजमध्येच मिळते असे नाही तर उत्तम शिक्षक लाभला तर ते अगदी खेडेपोडीही मिळेल. विद्यार्थ्यांनी जागतिक पातळीवर चमकण्यासाठी इंग्रजीवर प्रभुत्व मिळवायलाच हवे. तरच ज्ञानाची अनेक दालने त्यांच्यासाठी खुली होतील. बाबासाहेब जाधवराव यांचा विचार जपताना विविध उपक्रम राबविण्याचा आग्रह धरावा. ते माझे चांगले मित्र होते. त्यांची समाजाविषयी असणारी तळमळ नेहमीच भावत आली आहे.
मदनदादा भोसले म्हणाले, बाबासाहेबकाकांचा खूप जवळून सहवास लाभला. त्यांनी या विद्यालयाच्या वाढीसाठी घेतलेले परिश्रम विषेश मोलाचे आहेत. इथल्या विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर दिसणारा आत्मविश्वास, परीक्षेला सामोरे जाण्यास अवघे काही दिवस उरले असतानाही त्यांच्या ठायी दिसणारा निर्भयपणा विशेष भावनारा आहे. विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानासोबत स्वत:ला चौफेर विकसित करावे. सद्यस्थितीत विशेषत: विद्यार्थीनींची भरारी पाहता काही दिवसांनी बेटा बचाव बेटा पढाव असे म्हणण्याची वेळ येवू शकते.
भैय्यासाहेब जाधवराव म्हणाले, एकट्या भुईंज गावात विविध शाळांमधून साडेतीन हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यातील दोन हजार विद्यार्थी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात शिक्षण घेत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेले शैक्षणिक केंद्र म्हणून ग्रामीण भागात भुईंज हे एकमेव गाव आहे. या विद्यालयाने दर्जाच्या बाबतीत स्वत:ला कायम अग्रस्थानी ठेवले असल्याने विविध क्षेत्रात हे विद्यालय क्रमांक एकवर आहे. या विद्यालयाच्या वाढीसाठी प्रयत्न करण्याचे काम जबाबदारी व कर्तव्यभावनेतून करत असून त्यासाठी बाबासाहेब यांची प्रेरणा मोलाची ठरत आहे. यावेळी विद्यार्थीनी प्रांजल जाधव व पायल इंगुळकर यांनी मनोगत व्यक्त केले. आदर्श मुख्याध्यापक म्हणून प्राचार्य नामदेवराव जाधव, आदर्श शिक्षिका म्हणून हर्षदा इथाले यांचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी मोहनराव भोसले, किसन वीर कारखान्याचे माजी संचालक मधुकर शिंदे, भुईंजचे उपसरपंच शुभम पवार, सोसायटीचे चेअरमन मदन शिंदे, आबासाहेब वीर पतसंस्थेचे चेअरमन विलास जाधवराव, माजी उपसरपंच प्रशांत जाधवराव, उत्तमराव भोसले, अशोक शिंदे, बाळासाहेब जाधवराव, भाऊसाहेब जाधवराव, जितेंद्र जाधवराव, जगन्नाथ दगडे, राजेंद्र केंडे, संभाजी शिंगटे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रदीप कांबळे यांनी लिहिलेल्या मानपत्राचे वाचन विठ्ठल माने यांनी केले. पाहुण्यांचा परिचय राहुल तांबोळी यांनी करुन दिला. विजय नवले, संगिता जाधव यांनी सूत्रसंचालन केले तर उपमुख्याध्यापक मोहन कदम यांनी आभार मानले.
स्थानिक बातम्या
मावशीच्या नवऱ्याकडून सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार
- Tue 7th Feb 2023 04:56 pm
नागठाणेजवळ टेम्पोच्या धडकेत बापलेकीचा मृत्यू
- Tue 7th Feb 2023 04:56 pm
75 हजाराची लाच घेताना कोडोलीचा मंडलाधिकारी जाळ्यात
- Tue 7th Feb 2023 04:56 pm
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर' अभियानांतर्गत पुसेसावळीत उद्या कॅम्पचे आयोजन
- Tue 7th Feb 2023 04:56 pm
जिल्ह्यात कोरोनाचे एकूण चार रुग्ण त्यातील एकाचा काल मृत्यू
- Tue 7th Feb 2023 04:56 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 7th Feb 2023 04:56 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 7th Feb 2023 04:56 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Tue 7th Feb 2023 04:56 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Tue 7th Feb 2023 04:56 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Tue 7th Feb 2023 04:56 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Tue 7th Feb 2023 04:56 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Tue 7th Feb 2023 04:56 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Tue 7th Feb 2023 04:56 pm