आम्ही केलेलं काम जितेंद्र आव्हाड यांना बघवत नाही.

लोकांच्या भावना भडकवण्याचे काम अमोल मिटकरी करत आहेत.मंत्री शंभूराज देसाई

सातारा :- रायगड येथे शिवराज्यभिषेक दिन साजरा करण्यात आला.आमच्या सरकारने जे चांगलं केलंय त्यापासून लोकांचं लक्ष विचलित करायचं केविलवाना प्रयत्न जितेंद्र आव्हाड करत आहेत.. आम्ही केलेल काम हे त्यांना बघवत नसल्याचा टोला शंभूराज देसाई यांनी जितेंद्र आव्हाड यांना लगावत महाविकास आघाडीतील लोकांना कामच राहिले नाही.. 

उदयनराजे भोसले हे मुख्यमंत्र्यांच्या शेजारी उभे होते हे वाहिन्यांवरती दिसत होतं.ट्विट करून लोकांच्या भावना भडकवण्याचे काम अमोल मिटकरी करत आहेत.चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा वक्तव्य करणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनता गांभीर्याने बघत नसल्याचा सांगत अमोल मिटकरी यांच्या समाचार मंत्री देसाई यांनी घेतला आहे.

महाविकास आघाडीने लोकसभा-विधानसभा निवडणुका आमच्या युती समोर लढणार आणि बहुमत मिळवणार हे सांगण हास्यास्पद - शंभूराज देसाई

महाविकास आघाडी लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत राहणार का? टिकणार का? एकत्र तीघेजण निवडणूका लढवणार का? याच्यावर त्यांचं पहिलं एक मत होऊ द्या मग, त्यांचं जागा वाटप आणि कुठली जागा कोणाला हे ठरू द्या.. महाविकास आघाडीने वज्रमुठ सभा घेतल्या..कोण वक्ता बोलताना पोडियम मध्ये पाहिजे यामध्ये वाद असून कोणाची खुर्ची मोठी कोणाची खुर्ची छोटी यावरून वाद चालू आहेत.. त्यांनी आमच्या युती समोर लढणार आणि बहुमत मिळवणार हे सांगण हास्यास्पद असल्याचे सांगत महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय..

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला