४० वर्षानंतर भरला अपशिंगे (मि. )येथे माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

देशमुखनगर  :- श्री. छत्रपती शिवराय यांचे अश्वरुढ पुतळ्याच्या साक्षीने भव्य प्रांगणात अपशिंगे (मि.) या. सातारा येथे तब्बल ४०वर्षानंतर सण १९८२/८३ची एसएससी माजी विद्यार्थ्यांचा सस्नेह मेळावा मौजे अपशिंगे येथे नुकतेच संपन्न झाला यावेळी शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजळा मिळाला
जवळपास४०वर्षानंतर आठवनीची शिदोरी उलगडण्यासाठी,तसेच जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी, इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत ज्या शाळेमध्ये खेळलो, बागडलो, मौज मस्ती केली त्या शाळेतील जुन्या क्षणांना स्मरण्यासाठी... आणि ज्या शिक्षकांनी आम्हाला घडविले, कधी मार दिला तर कधी मायेचा हात फिरवला, आयुष्याला दिशा दिली अशा शिक्षकांविषयी, शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी.
आणि  ज्या वर्गात मित्र-मैत्रिणी , ज्यांच्याशी कधी भांडलो, रुसलो, हसलो, खेळलो त्यांना आपले  त्यांचे सुख दु:ख  जाणुन घ्यायला ओढ होती पुन्हा एकदा एकत्र "तोच बेंच तोच वर्ग" अनुभवण्या साठी आलेला सर्वाचीओढ दिसुन येत होती म्हणूनच एक सस्नेह भेट घडवून आणण्यात  ग्रूप तयार करण्यासाठी श्री अनिल भिकू निकम व सौ भारती पवार( फाळके) यांनी प्रयत्‍न केले सर्व  कार्यक्रमाचे संचालन श्री हेमंत निकम यांनी केले तर या आनंद सोहळ्यावर बारकाईने लक्ष ठेवून असलेले डॉ संजय घोरपडे यांनी अध्यक्षीय भाषण करून भरीव योगदान दिले तसेच शिक्षक यांनी आपले मोलाचे भाषणीय मनोगत व्यक्त केले , कार्यक्रमास उपस्थित सर्वाँना इतेच्छ भोजन व्यवस्था व सजावट ,लाईट डेकोरेशन करून कार्यक्रम शांततेत व आनंदी वातावरणात पार पडला . इयता  १ली पासुन आमचा पाया भक्कम रहायला सुरवात करनारे आमचे ९० वय पार केलेले श्री. भास्कर सुतार गुरुजी व प्रताप पवार यांनी व मोरे सर ,यादव मॅडम ,तावरे मॅडम यांची उपस्थिती लक्ष वेधून घेणारी ठरली तर वर्गातील सर्व मुले - मुली यांनी आर्थिक मदत करून कार्यक्रमास शोभा आणली प्रास्ताविक हेमंत निकम यांनी केले स्वागत अनिल निकम यांनी केले तर आभार संचालक संजय जाधव यांनी केले या वेळी शालेय जीवनातील आठवणी सर्वांना उजाळा दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ संजय घोरपडे व त्यांच्या पत्नी सौ डॉ वंदना घोरपडे  होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित  डॉ संजय घोरपडे यांनी आपले  कामाचा   व्याप बाजूला ठेवून खूप वेळ दिला . विद्यार्थी व विद्यार्थिनी एक मेकास संवाद साधून चर्चा विनिमय करत होते त्यावेळी   त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. अनेक वर्षांनी आपने एकत्र भेटत आहोत त्यामुळे ओळख लागते की नाही ही मनातील भावना होतीच. पण एकत्र आले आणि सर्वांनीच गळाभेट घेतली. कार्यक्रमचे नेटके संयोजन रवींद्र निकम , अनिल निकम , राजू काका , महादेव निकम , विलास निकम, भिकू मोहिते, प्रकाश निकम आप्पा , सौ नंदा निकम ( चव्हाण )यांनी केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यास मदत पां प पवार गुरूजी यांनी केले तर आभार संजय जाधव यांनी मानले

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त