भारत सरकारच्या 'स्वच्छ विद्यालय' पुरस्काराने सन्मानित

जिल्ह्यातील पाटण येथील  इंग्लिश मिडीयम शाळेने भारत सरकारच्या 'स्वच्छ विद्यालय' पुरस्कारात," पाटण व्हॅली इंग्लिश मिडीयम" या शाळेने सर्व निकष पूर्ण करून १०० टक्के गुण प्राप्त केले.
      देशपातळीवर सहभागी असणाऱ्या  शाळांमध्ये शहरी भागात राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त करून या शाळेने  जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. शाळेच्या या यशामुळे पाटणचे नाव राष्ट्रीय पातळीवर गाजत आहे. या यशाबद्दल शाळेचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. पाटण सारख्या दुर्गम भागात असणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी तालुक्याचे भाग्यविधाते माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी अनेक प्राथमिक,माध्यमिक शाळा सुरु केल्या.परंतु माझ्या तालुक्यात असणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्याला जगमान्य असलेली इंग्रजी भाषा शिकता यावी. या हेतूने सन २००० साली इंग्रजी माध्यमाची शाळा नर्सरी पासून सुरु केली. सुरुवातीला पाच विद्यार्थ्यांवर सुरु केलेल्या या शाळेमध्ये आज स्वमालकीच्या इमारतीत सुमारे ५०० विद्यार्थी इंग्रजी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. दादांचा हेतू सफल झाला आहे.मात्र, शाळेच्या प्रगतीत आणखी सुधारणा व्हावी. यासाठी दादांनी आपले सुपुत्र युवा नेते सत्यजितदादा यांच्या खांद्यावर 'पाटण एजुकेशन सोसायटी'च्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. त्यांनी सुद्धा आपल्या सर्व संचालक मंडळासोबत लीलया ती पेलली.शाळेच्या प्रगतीचा आलेख उंचाऊ लागला. फक्त शालेय अभ्यासक्रमच नाही तर इतर स्पर्धा परीक्षा, मैदानी खेळांमध्ये सुद्धा शाळेचा नावलौकिक जिल्हा व राज्यपातळीवर वाढत चालला आहे. आता पर्यंत अनेक विद्यार्थी विविध स्पर्धांमध्ये अव्वल आले आहेत. शाळेमध्ये स्वच्छतेलाही प्रचंड महत्त्व आहे. यामुळेच आज स्वच्छतेच्या बाबतीत शाळेचे नाव देशपातळीवर गाजत असून भारत सरकारचा 'स्वच्छ विद्यालय' हा पुरस्कारही शाळेने पटकावला आहे. शाळेच्या यशासाठी, नावलौकिक वाढवण्यासाठी शाळेतील प्राचार्य, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी नेहमीच प्रयत्नशील असतात.  या प्रत्येक घटकाने आपआपल्या परीने शाळेच्या प्रगतीसाठी अथक परिश्रम घेत आहेत.शाळेच्या प्रगतीसाठी महत्त्वाची कामगिरी बजावणारे प्राचार्य नितेश नाडे, उपप्राचार्य सौ. जयमाला पाटील तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांनी शाळेच्या स्वच्छतेपासून ते शिक्षणातील दर्जा उंचावण्यापर्यंत काम केले. आता देशपातळीवर शाळेचे नाव उज्वल करण्यापर्यंत अथक परिश्रम घेतले. शाळेला नावलौकिक प्राप्त झाला आहे.याबद्धल चेअरमन श्रीमंत सत्यजितसिंह पाटणकर, व्हा. चेअरमन यशवंतराव जगताप, सचिव बी.एन.पाटील, संचालिका श्रीमंत सौ. यशस्विनीदेवी पाटणकर, सौ. वंदना सावंत, संचालक दिनकरराव घाडगे, राजाभाऊ काळे व ऍड. राजेंद्र पाटणकर या सर्वांनी अभिनंदन केले व शाळेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त