लाचखोरांना पुन्हा शासकीय सेवेत घेऊ नये ,दिपक कांबळे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

सातारा :  शासकीय कर्मचारी किंवा अधिकारी यांनी जर लाच स्वीकारली तर त्यांना कायमस्वरूपी शासकीय सेवेतून निलंबित करावे, अशी मागणी स्वराज्य माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटनेचे अध्यक्ष दिपक कांबळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.शासकीय कर्मचारी जर लाच घेताना सापडला तर त्यांचे नाव हे जाहीरपणे विविध प्रसारमाध्यमावर प्रसारित केले पाहिजे. जेव्हा शासकीय कर्मचारी सरकारी नोकरीमध्ये नियुक्त होतो तेव्हा त्याला पद  -निष्ठा आणि कार्य - कर्तव्ये ,गोपनीयतेची शपथ दिली जाते.त्याप्रमाणे बरेचसे सरकारी कर्मचारी व अधिकारी वागतात देखील परंतु त्यातीलच काही रक्तपिपासू कर्मचारी व अधिकारी हे जनतेचे शोषण करतात. प्रत्येक गोष्टीला अगदी शिपायापासून ते क्लास वन अधिकारीही लाच  घेतल्याशिवाय काम करत नाहीत.बरं शासनाकडून यांना गलेलठ्ठ पगार ,सरकारी निवासस्थान ,सरकारी गाडी,नोकर- चाकर,औषध उपचार सगळे मोफत असते तरीही यांना जनतेच्या पैसा स्वतःच्या घशात घालायला जरासुद्धा शरम वाटत नाही. अनेकदा यांच्या तावडीतून शेतकरीराजाही सुटत नाही. पैसे दिल्याशिवाय सहीच करत नाही .विनाकारणं  व जाणून बुजून सर्वसामान्य जनतेला त्रास हे लाचखोर सरकारी नोकर करत असतात.
 बऱ्याच वेळा लाचखोर कर्मचारी किंवा अधिकारी हा लाच घेतल्यानंतर लगेच जामीन घेऊन बाहेर पडतो आणि पुन्हा परत नवीन ठिकाणी लाच घेण्यासाठी सज्ज होतात.लाच खाताना यांच्या चेहऱ्यावर जरासुद्धा लाज ,भिती ,अब्रू काहीही नसते.अशी लाचखोर समाजात उजळ माथ्याने फिरत असतात.काहीही करा आमचे कोणी काही करू शकत नाही या अविर्भावात ते राहत असतात. त्यामुळे शासनाने थातूर माथूर  कारवाई न करता त्याला कायमस्वरूपी शासकीय नोकरीतून निलंबित करावे.त्या कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन,भत्ते,सर्व सुखसोयी शासनाने काढून घ्यावेत.अशीही मागणी दिपक कांबळे यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त