जनता क्रांती दलाचे जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन

सातारा : कामगार सुरक्षा मंडळ सांगलीचे अध्यक्ष आणि सहाय्यक कामगार आयुक्त यांनी पात्र सुरक्षारक्षकांची यादी तशीच ठेवून बेकायदेशीर भरती केली आहे. पात्र सुरक्षारक्षकांना तात्काळ नेमणूक देण्यात यावी, अशी मागणी जनता क्रांती दलाच्या वतीने करण्यात आली आहे.

उंब्रज येथील मातंग समाजातील महिलांना हक्काची घरकुले दिली जात नाहीत, यासाठी यापूर्वीही ठिय्या आंदोलन सुरू होते. या दोन्ही मागण्यांसाठी जक्रांदच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. सुरक्षारक्षकांची नियमित नेमणूक आणि मातंग समाजांना हक्काची घरकुले मिळावीत यासाठी जनता क्रांती दलाने उपोषणाची तीव्रता वाढवली आहे. हे उपोषण बेमुदत सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

सातारा व सांगली जिल्ह्यामध्ये सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रचंड अनियमितता आहे. सहाय्यक सुरक्षा मंडळाचे अध्यक्ष व सहाय्यक कामगार आयुक्त यांनी या प्रकरणात मोठा भ्रष्टाचार केला आहे. कामगार मंत्रालयाकडून लिस्ट आली नाही, असे सांगण्यात येते. संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जनता क्रांती दलाच्या वतीने करण्यात आली आहे.

यावेळी जनता क्रांती दलाचे संस्थापक आणि प्रदेशाध्यक्ष सत्यवान कमाने, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष विकास सकट, सातारा जिल्हा अध्यक्ष रोहिणी लोहार, दत्ता केंगारे, अक्षय भिसे, नितीन वायदंडे, विशाल सपकाळ, विजय सोनवले आणि विशाल वायदंडे यांची उपस्थिती होती.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला