साताऱ्यातील २१ गावांना साडे पाच कोटी...घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापनाची चळवळ
Satara News Team
- Sat 14th Oct 2023 08:41 pm
- बातमी शेयर करा
सातारा : स्वच्छ आणि सुंदर तसेच आरोग्यपूर्ण गावासाठी घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन महत्वाचे आहे. यासाठी जिल्ह्यात सात तालुक्यांतील २१ ग्रामपंचायतींना ५ कोटी ५६ लाख रुपयांचा कार्यारंभ आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिला आहे. यातील सर्वाधिक ९ गावे ही कऱ्हाड तालुक्यातील आहेत. या कार्यारंभ आदेशाने लवकर कामे मार्गी लागून पूर्णत्वास जाणार आहेत.
घनकचरा आणि सांडपाण्याची समस्या सर्वत्रच आहे. याबाबत शासनस्तरावरुन विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे याबाबत गावागावांत जनजागृती होत चालली आहे. सातारा जिल्ह्यात तर घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन खूप चांगल्या पध्दतीने सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून यासाठी प्रयत्नही करण्यात येतात. आता सात तालुक्यातील २१ गावांना व्यवस्थापनासाठी साडे पाच कोटी निधीचा कार्यारंभ आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी दिला आहे.
जिल्ह्यातील लोकसंख्या आणि विस्ताराने मोठ्या आसलेल्या कऱ्हाड तालुक्यातील काळगाव, उंडाळे, दुशेरे, रेठरे खुर्द, वहागाव, कोडोली, रेठरे बुद्रुक, विरवडे, इंदोली या गावांना कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. तसेच फलटण तालुक्यातील विडणी, खटाव तालुक्यातील मायणी, निमसोड व सिद्धेश्वर कुरोली तर माण तालुक्यातील पळशी, गोंदवले बुद्रुक. सातारा तालुक्यातील अतित, खोजेवाडी, जकातवाडी, त्याचबरोबर पाटण तालुक्यातील ढोरोशी, विहे आणि जावळी तालुक्यातील कुडाळ या ग्रामपंचायतींना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत.
या निधीतून गावांमध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची कामे केली जाणार आहेत. घनकचऱ्यासाठी नॅडेफ व गांडुळ खत प्रकल्पाद्वारे खत निर्मितीही केली जाणार आहे. तर सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्डे, लिच पिट, रिड बेड, रुट झोन प्रक्रिया केली जाणार आहे. तर स्वच्छ सुंदर व आरोग्यपूर्ण गावांसाठी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन गरजेचे आहे. आता ग्रामपंचायतींना ही कामे दर्जेदार होण्यासाठी लक्ष ठेवावे लागणार आहे. ओला व सुका कचरा कुटुंबपातळीवरच वर्गीकरण करावे लागेल. त्यातील ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करण्यात होईल. सांडपाणी व्यवस्थापनाच्या कामांमुळे भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यास मदत होणार आहे. तसेच पाणीस्त्रोतांचे प्रदूषणही थांबले जाणार आहे.
जिल्ह्यातील १७३८ पैकी ९४४ गावांची घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची कामे पूर्ण झालेली आहेत. सध्या काही ग्रामपंचायतींची कामे सुरु आहेत. त्यांनी घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थानाची सर्व कामे आक्टोंबर महिनाअखेरपर्यंत पूर्ण करावीत. तसेच ग्रामपंचायतींनीही सर्व कामे चांगला दर्जा आणि गुणवत्तापूर्ण करण्याची आवश्यकता आहे. - ज्ञानेश्वर खिलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Sat 14th Oct 2023 08:41 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sat 14th Oct 2023 08:41 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sat 14th Oct 2023 08:41 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sat 14th Oct 2023 08:41 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sat 14th Oct 2023 08:41 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sat 14th Oct 2023 08:41 pm
संबंधित बातम्या
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Sat 14th Oct 2023 08:41 pm
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sat 14th Oct 2023 08:41 pm
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sat 14th Oct 2023 08:41 pm
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Sat 14th Oct 2023 08:41 pm
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Sat 14th Oct 2023 08:41 pm
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sat 14th Oct 2023 08:41 pm
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Sat 14th Oct 2023 08:41 pm
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Sat 14th Oct 2023 08:41 pm











