सोयाबीन पेटवणाऱ्या आज्ञाच व्यक्तीचा पोलिसांनी शोध घ्यावा

( युवा नेते हरिश्चंद्र सावंत यांची मागणी )

 विसापूर तालुका खटाव येथील शेतकरी व पत्रकार पंकज कदम यांनी विसापूर व खातगुण हद्दीवर महारकी शिवारातील किमान दोन एकरातील काढलेले सोयाबीन गंज लावून मळणीसाठी ठेवले होते ते सोयाबीन अज्ञात व्यक्तीने पेटवून दिले त्याचा शोध पोलिसांनी घेऊन अशा समाजकंटक व्यक्तीला आळा घालावा असे विसापूर येथील युवा नेते हरिश्चंद्र सावंत यांनी मागणी केली आहे
 यावेळी हरिश्चंद्र सावंत (चाचा), व श्रीरंग (आबा )साळुंखे यांनी  महारकी शिवारात जाऊन शेतीमधील जळीत पिकाची पाहणी केली व आमदार महेश शिंदे यांना फोन करून ही घटना सांगितली यानंतर आमदार महेश शिंदे यांनी फोनवरून शेतकरी व पत्रकार पंकज कदम यांचे सात्वन केले व आम्ही या दुःखात सामील असल्याचे सांगून अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यासाठी सूचना  केल्या आहेत असे सांगितले यावेळी हरिश्चंद्र सावंत यांनी मी व माझ्या पक्षाच्या वतीने या घटनेचा निषेध करतो असे सांगितले व या घटनेचा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करून पंचनामा त्वरित करावा असे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून सांगितले आहे

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला