नागपूर विधानसभेवर स्त्रीभूषण रमाई आंबेडकर संस्थेतर्फे भव्य मोर्चाचे आयोजन

सातारा : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांच्या जीवनाशी संबंधित अनेक वास्तु महाराष्ट्रातील विविध भागात अजूनही दुर्लक्षित स्थितीत आहेत. त्यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या वास्तू त्यांच्या कोट्यावधी अनुयायांसाठी परम पवित्र आहेत. या स्थळांच्या दुर्लक्षेमुळे आंबेडकरी अनुयायांच्या भावना दुखावल्या जात आहेत. या बाबीची आपण दखल घेवून  पवित्र स्थळांचे संरक्षण, संवर्धन व सौदयीकरण करावे.अशाप्रकारच्या मागणी साठी सोमवार दि.१९ रोजी दुपारी १२ वा.यशवंत स्टेडियम, नागपूर येथून मोर्चास सुरवात होणार आहे.शेवटी नागपूर विधानसभेवर धडकणार आहे.अशी माहिती बंधुत्व प्रतिष्ठान पुरस्कार विजेते तथा स्रीभूषण रमाई आंबेडकर संस्थेचे अध्यक्ष राजकुमारी वंजारी यांनी दिली.
           डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाई आंबेडकर यांच्यावर दि. २७ मे १९३५ रोजी मुंबईच्या वरळी स्मशान भूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या स्थळावर रमाईचे स्मारक उभारण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली होती.परंतु , अजुनही काम सुरू झालेले नाही. या कामाची सुरूवात तातडीने करून सरकारने वचनपूर्ती करावी. मुंबईतील परळ येथील बी. आय. टी. चाळ क्र. १ खोली क्र. ५० व ५१ या दोन खोल्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटूंबियांचे १९१२ ते १९३४ असे प्रदीर्घ वास्तव्य होते. येथूनच ते विश्वविख्यात विद्वान व महान नेते म्हणून प्रसिध्दीस पावले या ठिकाणी सरकारने घोषीत केल्याप्रमाणे स्मारकाची निर्मिती तातडीने सुरू करावी. दादर रेल्वे स्टेशनला, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनल" असे नामकरण करण्यात यावे. रत्नागिरी जिल्हयातील दापोली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बालपण गेले. त्यांचे वडील सुभेदार रामजी सपकाळ हे
महू (मध्यप्रदेश) येथून १८९३ मध्ये सेनेतून निवृत्त झाल्यानंतर दापोली कॅम्प येथे त्यांचे कुटूंबिय वास्तव्यास आले. १८९४ पासून बरीच वर्षे सुभेदार रामजी कुटूंबियांचे दापोलीत वास्तव होते. ही वास्तू आता दुर्लक्षित आहे. या वास्तूचे जतन करण्यासाठी स्मारक घोषिक करून तातडीने काम सुरू करावे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर कुटुंबियांचे मुळ गाव आंबडवे व रमाई आंबेडकर यांचे जन्मगाव वणंद (जिल्हा रत्नागिरी) येथे उर्वरित विकासकार्य करावे.सातारा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वास्तव राहिलेल्या वास्तूंचे संरक्षण व जतन करावे.पुणे जिल्हयातील तळेगाव दाभाडे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निवास स्थानाजवळील प्लॉट क्र. २९ ते ३४ ची मोकळी जागा अधिग्रहीत करून स्मारक निर्मिती करावी.
भीमा-कोरेगाव स्मारकाचे सौंदयीकरण सरकारच्या घोषणेनुसार करण्यात यावे.रमाई आंबेडकर यांचे जीवनचरित्र इयत्ता ९ वी ते १२ च्या शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात यावे.नागपूर येथील दीक्षाभूमीला लागुन असलेली कृषि विद्यापीठाची जागा दीक्षाभूमिच्या उपयोगासाठी देण्यात यावी. नागपूर येथील अंबाझरी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन त्याच जागेवर पुर्नबांधणी करण्यात यावी. नागपूर शहरात महानगर पालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी वर्षानिर्मित्त घोषित स्मारकाचे काम अजूनही प्रलंबित आहे ते कार्य तातडीने सुरू करण्यात यावे.नागपूर जिल्हयातील कामठी येथे जयभीम चे जनक बाबु हरदास एल.एन. यांचे स्मारक उभारण्यात यावे. महाराष्ट्रातील बुध्द लेण्या हा राष्ट्राच्या समृध्द इतिहासाचा पुरावा आहे. परंतु, या लेण्यांचे विद्रूपीकरण होतांना दिसत आहे, या बाबींची गंभीर दखल घेऊन सर्व लेण्यांचे सरंक्षण, संवर्धन व जतन करण्यासाठी तातडीने पाऊले उचलावीत.अशा मागण्यांच्या पूर्ततेसाठी निघणाऱ्या मोर्चात आंबेडकरप्रेमींनी सहभागी व्हावे.असे आव्हान वंजारीसह, दिलीप तांदळे,वंदना निकोसे, अंजना मेश्राम,प्रगती पारसे आदींनी केले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त