भुईंजमध्ये विवाहितेची आत्महत्या पतीला अटक सासूसह नणंदेचा शोध सुरु

भुईंज : भुईंज कौटुंबिक कारणावरून झालेल्या वादातून विवाहितेने विषारी रसायन घेवून आत्महत्या केली आहे.ही घटना गुरुवारी ता ३१ रोजी सायंकाळच्या  सुमारास भुईंजमधील चंद्रसेनगर येथे घडली पायल अक्षय वाघ वय २६ असे  असे आमहत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी विवाहितेची आई सुवर्णा अविनाश आवारे रा.अजनूज ता.खंडाळा यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पती अक्षय संभाजी वाघ यास अटक केली आहे.तर सासू,आशा संभाजी वाघ व नणंद प्रज्ञा अमोल पिसाळ रा.बावधन याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला  आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहितेचे लग्न २०१६ सारी झाले होते तेव्हापासून पती,सासू,नणंद हे कौटुंबिक कारणावरून तसेच माहेरचे लोक भिकारी आहेत,तुला स्वयंपाक व घरातील काम येत नाही असे टोचून टोमणे मारत सतत मानसिक व शारीरिक त्रास देत होते.ता.३१रोजी साडीच्या कारणावरून  घरात वादावादी झाली होती.त्यानंतर घरातील सर्वजण आपापल्या कामाला गेले होते.सायकाळी पती अक्षय आईला आणायला दुचाकी वरून गावात गेला होता.त्यादरम्यान पायाने घरात असलेले पिकावर फवारण्याचे विषारी औषध पिले, दरम्यान तिचा पती सासू घरी आल्यावर ही बाब लक्षात आल्याने पती अक्षयने तिला सातारा येथे उपचारासाठी नेले मात्र, उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची नोंद भुईंज पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विशाल भंडारे, हवालदार नितिन जाधव, विजय अवघडे, शिवाजी तोडरमल हे करीत आहेत

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला