छ.शाहु महाराज जनता-जनार्धनासाठी झटणारे अद्वितीय राजे होते : डॉ. साळुंखे

सातारा: लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे कार्य समाजातील सर्व घटकासाठी अजरामर ठरणारे आहे.त्यामुळे त्यांच्या विचाराची आज गरज आहे.त्यांची जनता-जनार्धनासाठी झटणारे म्हणून अद्वितीय राजा म्हणून तहहयात अशी ख्याती राहील. असे प्रतिपादन डॉ.श्रीधर साळुंखे यांनी केले.
             येथील श्री.छ.प्रतापसिंह महाराज थोरले नगरवाचनालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ.साळुंखे मार्गदर्शन करीत होते.ते पुढे म्हणाले, "राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी बहुजन समाजासाठी केलेल्या कार्यामुळे प्रगती आढळून येत आहे.तरुण पिढीने महापुरुषांची चरित्रे वाचली पाहिजेत.तपशीलांसह बारकाईने अभ्यासली पाहिजेत." 
                  "अतिशय प्रेरणादायी लोकराजा होते.काळाचा पुढचा विचार ते करत असे. अनेक लोकोपयोगी सुधारणा त्यांनी घडवून आणल्या.सध्याच्या युवा पिढीने त्यांच्या चरित्राचा  निश्चितपणे अभ्यास करावा. त्यातील वैशिष्ट्ये समजून घ्यावीत." असे विचार महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुणे प्रतिनिधी शिरीष चिटणीस यांनी व्यक्त केले. 
     नगर वाचनालयाच्या कार्यवाह वैदेही कुलकर्णी यांनी मनोगतात राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याचा अभ्यासपूर्ण असा आढावा घेतला. संचालक डॉ. राजेंद्र माने यांनी या कार्यक्रमामागची भूमिका स्पष्ट करून आभारप्रदर्शन केले. प्रारंभी, प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.शिवाय दीपप्रज्वलनही मान्यवरांनी केले. यावेळी बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर,ग्रंथपाल मुळे मॅडम,कर्मचारी वर्ग,नगर वाचनालयाच्या अभ्यासिकेतील अध्ययनार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला