सातारा कृषी विभागीय कार्यालयात दुपारीच सन्नाटा! शेतकर्‍यांमध्ये संताप

Silence in Satara Agriculture Divisional Office in the afternoon! Anger among farmers

सातारा  : जिल्ह्यात राज्य शासनाच्या कृषी विभागाचा बोर्‍या वाजला आहे. तालुका पातळीवर काम करणार्‍या विभागीय कृषी कार्यालयात वरिष्ठ अधिकारीच सापडत नसल्याने शेतकर्‍यांना प्रचंड मनस्ताप करावे लागत असून सातारा, कोरेगाव, खटाव तालुक्यातील शेतकरी सतत हा अनुभव घेत आहेत. सातारा कृषी विभागीय कार्यालय तर भरदुपारीच सामसूम असते. त्यामुळे कामानिमित्त आलेल्या शेतकर्‍यांना आल्या पावली माघारी जावे लागत असल्याने जिल्हा अधीक्षक, संचालकांनी लक्ष घालावे, अशी मागणी शेतकर्‍यांतून होत आहे.सातारा कृषी विभागीय कार्यालयांतर्गत सातारा, कोरेगाव तसेच खटाव हे तीन तालुके येतात. सध्या या तालुक्यांमध्ये कृषी विभागाकडून काय काम केले जाते हे वरिष्ठ व तालुक्यांत काम करणारे अधिकारीच सांगू शकतात. शेतीच्या हंगामामुळे शेतकर्‍यांना अनेकदा अडचणी येत आहेत. असे असतानाही सातारा विभागीय कृषी अधिकार्‍यांनी कुठे दौरे केल्याचे किंवा कारवाई केल्याचे समोर आलेले नाही. या कार्यालयांतर्गत तालुका पातळीवर असलेल्या काही कार्यालयांकडून दाद मिळत नाही. याच कार्यालयांनी गावागावात काही कंपू पोसले आहेत. त्यांनाच शेती येाजनांचा लाभ मिळताना दिसत आहे. त्यामुळे सरकारी योजनेतील खरे लाभार्थी वंचित राहू लागले असून तक्रारी वाढू लागल्या आहेत. न्यायाच्या अपेक्षेने वरिष्ठ कार्यालयाकडे येणार्‍या शेतकर्‍यांना वरिष्ठ अधिकारीच जर भेटत नसतील तर याला काय म्हणावे? या वैतागलेल्या शेतकर्‍यांनी सातारा विभागीय कृषी अधिकार्‍यांच्या कार्यालयावर मोर्चा आणण्याचे नियोजन केले आहे. फील्डवर आहे, मिटिंगमध्ये आहे, दौर्‍यावर आहे, साईटवर आहे अशी उत्तरे ऐकून शेतकरी वैतागले असून शेतकरी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे जिल्हा कृषी अधिक्षक तसेच कृषी संचालक, आयुक्तांनी सातारा विभागीय कृषी कार्यालयाच्या कारभारात लक्ष घालावे, अशी मागणी शेतकर्‍यांतून होत आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला