जिल्ह्यात ७४३ शाळा खोल्या धोकादायक...!!
प्रकाश शिंदे - Fri 22nd Jul 2022 09:00 am
- बातमी शेयर करा
सातारा - जिल्हा परिषदेच्या २२७ शाळांच्या ७४३ खोल्या धोकादायक बनल्याचे जिल्ह्यात चित्र आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसात विद्यार्थी हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत असून, एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शाळांच्या खोल्या पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करणे आवश्यक होते. मात्र, शिक्षण विभागाच्या डोळेझाकपणामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जिल्ह्यात दोन हजार ७४५ शाळा आहेत. यामधील दहा टक्के शाळांच्या खोल्या धोकादायक स्थितीत आहेत. त्यातील काही शाळा या जिल्ह्यातील दुर्गम भागातील आहेत. त्या भागात पाऊस अधिक प्रमाणात असतो. धोकादायक खोल्या असलेल्या शाळांमधील अनेक खोल्यांना तडे जाणे, छत गळणे, पत्र्यातून पावसाचे पाणी येणे यासारखी स्थिती आहे. या परिस्थितीमुळे शाळेतील विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये डिजिटल शिक्षण पध्दती सुरू केली असताना, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुसज्ज खोल्या असणे आवश्यक आहे. मात्र, झेडपीच्या काही शाळांमध्ये धोकादायक स्थितीत शिक्षण सुरू आहे. याबाबत काही शाळांच्या शिक्षकांनी शाळांच्या स्थितीबाबत शिक्षण विभागाला माहितीही दिली होती. परंतु, शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. धोकादायक शाळा खोल्यांची संख्या पाहता सर्वाधिक धोकादायक खोल्यांची संख्या कऱ्हाड (२८२) तालुक्यात तर सर्वांत कमी महाबळेश्र्वर (७) तालुक्यात आहे.
झाडाखाली भरते शाळा
चिंचणी (ता. खटाव) गावातील शाळा धोकादायक स्थितीत आहे. त्या भागातील विद्यार्थ्यांची शाळा झाडाखाली भरत आहे. या शाळेत आठ खोल्या असून त्यातील एक खोली स्लॅबची आहे. ती देखील गळत आहे. त्यामधील लोखंडी सळ्या उघड्यावर असून उर्वरित पत्र्याच्या दोन खोल्यांमधून पाणी झिरपत आहे. त्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांना झाडाखाली बसूनच शिक्षण घ्यावे लागत आहे.
स्थानिक बातम्या
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Fri 22nd Jul 2022 09:00 am
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Fri 22nd Jul 2022 09:00 am
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Fri 22nd Jul 2022 09:00 am
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Fri 22nd Jul 2022 09:00 am
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Fri 22nd Jul 2022 09:00 am
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Fri 22nd Jul 2022 09:00 am
संबंधित बातम्या
-
खटावच्या विद्यमान तहसिलदारांनी खटावच्या जनतेला दुसऱ्यांदा स्वातंत्र्य मिळवून दिले?
- Fri 22nd Jul 2022 09:00 am
-
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Fri 22nd Jul 2022 09:00 am
-
पुसेसावळी येथे लागोपाठ चोऱ्यांचे सत्र सुरूच, पोलिस प्रशासन मात्र हतबल!
- Fri 22nd Jul 2022 09:00 am
-
सहा.पो.नि. अक्षय सोनवणे यांचा सराईत गुन्हेगारांना दणका
- Fri 22nd Jul 2022 09:00 am
-
पुसेसावळीतील सावकारी च्या 'उदय' मुळे कळंबीतील एक कुटुंब 'अस्त' होण्याच्या मार्गावर...
- Fri 22nd Jul 2022 09:00 am
-
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Fri 22nd Jul 2022 09:00 am
-
वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस.
- Fri 22nd Jul 2022 09:00 am
-
औंध पोलिस ठाण्याचे कारभारी मतेंवर गोरे अंकुश ठेवणार? कि पोलिस अधीक्षक दोषी ठरवणार?
- Fri 22nd Jul 2022 09:00 am












