छ.शाहू महाराज यांनी समाजाला समतेची शिकवण दिली-श्री अनिल पानस्कर

ढेबेवाडी:महाराष्ट्र शासनाच्या वतीने सामाजिक व विशेष सहाय्य विभाग यांच्याद्वारे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी केली जाते. यानिमित्ताने कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ढेबेवाडी मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली या जयंतीच्या निमित्ताने बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री अनिल पानस्कर म्हणाले "राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा वसा व वारसा प्रत्येक विद्यार्थ्यांनी पुढे घेऊन चालले पाहिजे. सामान्य लोकांना सामाजिक न्याय मिळावा यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. शाहू महाराज हे कोल्हापूरचे शाहू व चौथे साहू अशा विविध नावाने प्रसिद्ध होते. शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक होते. शिक्षण,विधवा पुनर्विवाह, बालहत्या प्रतिबंध, आरक्षण,समता आणि बंधुता अशा विविध गोष्टीतून त्यांनी कृतिशील कार्य केले.समाजातील अनेक रूढी परंपरा नष्ट केल्या यामुळे राज्य सरकार शाहू महाराजांचा जन्मदिवस 2006 पासून सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करीत आहे. आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा करत त्यांनी समाजात मोठा बदल घडवून आणला होता. त्यांनी खऱ्या अर्थाने समाजाला समतेची शिकवण दिली. याप्रसंगी सुशीलकुमार कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी प्राचार्य एम एस.पाटील उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्राध्यापक दादाराम साळुंखे यांनी मांनले. या कार्यक्रमास विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमास छत्रपती शाहू महाराज यांच्या आठवणीने विद्यार्थ्यांच्यामध्ये   प्रबोधनात्मक परिवर्तन झाले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला