कर्जमाफी वीजबिल माफी अशा नावाखाली शेतकऱ्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र- शेतकरी नेते संजय भगत

पुसेगाव : वीज वितरण कंपनी कडे कृषी पंपाचे  बिलापोटी अनुदान जमा करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करावे आणि उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या कडून बिलापोटी भरून घ्यावी  कर्जमाफी व विज बिल माफी शेतकऱ्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र समाज हिताला घातक आहे असे रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदस्य तथा शेतकरी नेते संजय भगत यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेल्या निवेदनात स्पष्ट केली आहे 
         शेतीपंपांना 24 तास वीज पुरवठा होत नसून केवळ 8 तास कृषी पंपांना वीज दिली जाते  तो विज पुरवठाही पूर्ण क्षमतेने व पूर्ण वेळ नसतो तरीही अनुदानापोटी करोडो रुपयांचे लूट वीज वितरण यंत्रणे कडून केली जाते याबाबत शेतकरी संघटनांनी कायदेशीर मार्गाने कोर्टातून न्याय मिळवून घेतला आहे तरीही कोर्टाच्या आदेशाला न जुमानता या चुकीच्या पद्धतीत  शेतकरी भरडला जातोय , सरकारी अनुदानाचा ही गैरवापर होत आहे आणि वरून वीज वितरण वाल्यांची उपकाराची भाषा शेतकऱ्यांना ऐकून घ्यावी लागते हे सर्व थांबवण्यासाठी  वीज वितरण कर्मचाऱ्यांच्या संपानिमित्ताने सरकारने एक निर्णय घ्यावा आणि कृषी पंपाचे वीज बिला साठी दिले जाणारे अनुदान व उर्वरित बिल हे शेतकऱ्याकडून कृषी पंपाच्या बिलापोटी भरून घ्यावे आम्ही शेतकरी आनंदाने विज बिल वेळेत व वेळेवर भरण्यास तयार आहे असे संजय भगत यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे .कर्जमाफी व विज बिलमाफी नावाखाली शेतकऱ्यांना बदनाम करण्याचे कटकारस्थान थांबवावे स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी शेतकऱ्याच्या नावाचा वापर करून शेतकऱ्याची प्रतिमा मलीन करण्याचे उद्योग आता बंद करा असे प्रसिद्धी पत्रकात संजय भगत यांनी म्हटले आहे

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला