धोम धरणातून तीन रोटेशन पाणी आणणार-रणजीत फाळके

शिवथर : पाणी बचाव संघर्ष समिती वाई जावली सातारा कोरेगाव या तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी शेतीच्या पाण्यासाठी जीवाचं रान करणार. वारंवार धूम धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून शेतीच्या पाण्यासाठी संघर्ष केला आहे आमच्यावर बऱ्याचदा कैसे देखील दाखल झालेल्या आहेत परंतु आम्ही मागे हटणार नाही सर्व शेतकरी आमच्या संघर्ष समितीला पाठबळ देत असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही दोन धरणाचा पाणीसाठा 13.50 टीएमसी असून त्यातील 11.42 सिंचन साठी दिला जातो आम्ही कार्यकारी अभियंता योगेश शिंदे यांच्याबरोबर चर्चा केली आहे त्यामुळे उद्या किंवा परवा कॅनलला पाणी सोडले जाणार आहे आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे पण तुम्ही आमच्याबरोबर पाहिजे सोसायटीच्या ताकतीने सर्व काही शक्य होऊ शकते राज्यकर्त्यांनी संपूर्ण पाण्याचा वापर यावर अभ्यास केला तीन वर्ष अभ्यास करून मान खटावला पाणी वळवण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी मागणी अर्ज करणे गरजेचे आहे पाणीपट्टी वसूल झाली तर होऊ द्या पण पाण्याचा हक्क सोडू नका दोन धरणासाठी पुनर्वशीत लोकांना आपण जमिनी दिले आहेत त्यामुळे दोन धरणाचे मालक आपण आहोत असे प्रतिपादन पाणी बचाव संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष रणजीत फाळके यांनी केले.
त्यावेळी पाणी बचाव संघर्ष समितीचे सचिव नंदकुमार पाटील पृथ्वीराज बर्गे अर्जुन भोसले सुधाकर बर्गे जगदीश पवार संतोष जाधव माणिक भोसले शिवथरगावचे माजी उपसरपंच नवनाथ साबळे किसनराव साबळे पाटील विकास सेवा सोसायटीचे चेअरमन जितेंद्र पिसाळ कोरेगाव पंचायत समिती ची माजी गट विकास अधिकारी विलास साबळे उपसरपंच दत्तात्रय साबळे. अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे संचालक पांडुरंग साबळे सुनील जाधव शिवशक्ती पतसंस्थेचे माजी चेअरमन हनुमंत साबळे माजी उपसरपंच दिलीप साबळे बाबुराव साबळे लक्ष्मण साबळे सूर्यकांत साबळे किसनराव साबळे पाटील पतसंस्थेचे व्हा. चेअरमन अशोक साबळे किसनराव साबळे पाटील सोसायटीचे माजी चेअरमन संजय साबळे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप साबळे उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक रमेश साबळे शरद इनामदार जितेंद्र साबळे आदी मान्यवर उपस्थित होते
प्रास्ताविक नितराज साबळे यांनी केले आभार माजी उपसरपंच नवनाथ साबळे यांनी केले
नंदकुमार पाटील म्हणाले-45 दिवस पिकाला पाणी मिळाले नाही शेतीच्या पाण्यासाठी जागृत राहिले पाहिजे पाच वर्षे हेलपाटे मारत होतो 2012 पासून ते 2019 पर्यंत पाणी बचाव संघर्ष समितीने संघर्ष केला आपापल्यात वाद न होता शेतकरी जात म्हणून लढू आपल्याला पक्ष राजकारण बघू नका आपला तोटा होत आहे त्यासाठी पाहण्यासाठी भांडले पाहिजे शेतीशिवाय पर्याय नाही आपल्या मुलांना नोकरी नाही शेतीसाठी पाणी पाहिजे यासाठी पाणी बचाव संघर्ष समिती बरोबर रहा तसेच दिनांक 30 रोजी कोरेगाव तहसील ऑफिस समोर आम्ही आंदोलन करणार आहे यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला